मुंबई : आम्ही येणार म्हणणारे फडणवीस हे सत्तेकडे आशाळभूतपणे पाहात आहेत असे चित्र आम्हाला दिसते आहे, असा जोरदार टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.
भाजप नेत्यांकडून सातत्याने महाविकास आघाडी सरकार पडण्याचा दावा केला जात आहे. यावर बोलताना थोरात म्हणाले की, हाविकास आघाडीत कोणतीही धुसफूस, वाद नाहीत आमचं सरकार पाच वर्षे चालणार आहे, त्यापुढेही चालणार आहे.
विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईनचा नारा दिला होता. यावरून आता थोरात यांनी ‘आम्ही येणार म्हणणारे फडणवीस हे सत्तेकडे आशाळभूतपणे पाहात आहेत असे चित्र आम्हाला दिसते आहे’, असा खोचक टोला फडणवीसांना लगावला.
यावेळी बोलताना थोरात यांनी शरद पवार हे राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले, असे मत देखील व्यक्त केले.