डोंबिवली : बार आणि रेस्टॉरंट खुली केली आहेत, मग मंदिर आणि जीमबद्दल सरकार असे धोरण का घेत आहे. मंदिर हा आस्थेचा विषय आहेच. त्याच्या भोवती फिरणारी आर्थिक व्यवस्था असते. अनेक मराठी मुलांनी जीम व्यवसाय सुरू केले आहेत. त्यांचे 6 महिन्यांचे भाडे थकले आहे. ते कुठून देणार, असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.
हे लोक राज ठाकरे यांच्याकडे गेले होते. त्यामुळेच सरकार जीम व मंदिरे खुली करण्याच्या निर्णय घेण्यात दिरंगाई करीत असल्याचा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे. तसेच या सरकारच्या विरोधात डंबेल्स घेऊन मोर्चा काढा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे आवाहन राजू पाटील यांनी जीम ट्रेनर चालकांना केले आहे.
तत्पूर्वी राज ठाकरेंनीही मंदिरं खुली केली पाहिजेत, अशी भूमिका मांडली होती. सरकारने मंदिरं सगळ्यात शेवटी उघडून उगाच नको ते पुरोगामित्व दाखवू नये, त्यापेक्षा एक नियमावली आखावी आणि हिंदूजनांच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचललं नाही, तर आम्हाला नाइलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल,असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता.
Read Also
शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे, भाजपच्या बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळhttps://t.co/2zhQL3dT18#Shivsena #SharadPawar #BJP #shivajiraokardile
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 7, 2020