मुंबई : २०१४ साली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हते. त्यावेळी भाषणाच्या वेळी स्टेजवर हिरोसारखे येत होते. अन् डाव्या हाताने अभिवादन करायचे. आयुष्यात त्यांनी कधी उजव्या हाताने अभिवादन केले नाही. स्टेजवर आल्यानंतर त्यांची भाषणाची सुरूवात अच्छे दिन तर दुसऱ्या बाजूला आयेंगे अशा घोषणा यायच्या असं म्हणत शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी नरेंद्र मोदी यांची मिमिक्रि केली.
भास्कर जाधव पुढे म्हणाले, २०१९ साली पुलवामा येथे देशाचे ४० जवान मारले जात होते तर दुसऱ्या बाजूला चित्रपटासाठी कपडे तयार करण्यासाठी फोटो काढण्यामध्ये व्यग्र होते आणि त्यांच्याच पक्षातील तात्कालीन राज्यपाल्यांनी विमानाची मागणी केली होती. परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्र्यांनी एक विमान दिला नाही आणि ४० जवान मारले गेले.
त्यानंतर मोदींनी सर्जिकल स्टाईक केला. परंतु त्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले याचा कोणीही खुलासा केला नाही. त्यानंतर मोदींनी पुढच्या निवडणुकीला फायदा करून घेतला. त्यानंतर लाल किल्ल्यावरून पुढचा पंतप्रधान मीच होणार असं अहंकारपणे सांगितला. परंतु पुढच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. असंही भास्कर जाधव यांनी सांगितले.