पाटणा : बिहार विधानसभा निवडणूक आता अंतिम चरणावर असताना आता राजकीय पक्ष आपापले जाहीरनामे घोषित करत आहे. काल भाजप आणि जेडीयूने आपला जाहीरनामा घोषित केला आहे. आता त्यातच राष्ट्रीय जनता दलानेही आपला जाहीरनामा घोषित केला आहे.
त्यात त्यांनी राजद च सरकार आलं तर आम्ही १० लाख नोकर्या देऊ असं आश्वासन दिल आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. त्यातच मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष घोषणांचा पाऊस पाडत आहेत. राष्ट्रीय जनता दलाने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात 10 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे.
राष्ट्रीय जनता दलाने कोणती आश्वासने बिहारच्या जनतेला दिली?
बिहारमधील तरुणांना सरकारी नोकरीचा अर्ज करताना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.बेरोजगार तरुणांना 1500 रुपये बेरोजगार भत्ता देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सरकारी नोकरीत बिहारमधील तरुणांना प्राधान्य देण्यासाठी राज्य सरकार अधिवास धोरण आणेल आणि सरकारी नोकरीत 85 टक्के पदे बिहारमधील तरुणांसाठी राखीव ठेवली जातील.
याशिवाय राष्ट्रीय जनता दलाने शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली आहे. नवीन उद्योगांसाठी नवीन धोरण आणले जाईल, नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी कोणताही कर लावला जाणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.
Read Also :
महाराष्ट्राचे शेतकरी भारताचे नागरिक नाही का? विश्वजित कदमांचा सवालhttps://t.co/JH2XynOOCJ @vishwajeetkadam #congress
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 24, 2020