अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत आलेले बिहार शहर पूर्वचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांचे मुंबई महानगरपालिकेने क्वारंटाईन समाप्त केले आहे. तिवारी यांना दोन दिवसांत मुंबई सोडण्याचे आदेश मुंबई पालिकेनं दिले आहे.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत असताना बिहार सरकारने तपास आपल्याकडे वर्ग करावा अशी मागणी लावून धरली. एवढंच नाहीतर बिहारचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी हे मुंबईत 2 ऑगस्ट रोजी दाखल झाले होते. मुंबईत आल्यावर त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते.
आज अखेर विनय तिवारी यांची क्वारंटाईनमधून मुक्तता करण्यात आली असून बिहार पोलिस यांनी तिवारी यांना पुन्हा बिहार येण्यास परवानगी मागितली होती. त्यामुळे 8 ऑगस्ट आधी महाराष्ट्रातून पुन्हा बिहार जावे, अशी सूचनाही पालिकेने दिली आहे.