मुंबई : सध्या देशभरात कृषी सुधारणा विधेयकामुळे राजकीय वातावरण तापले आहे. सरकारच्या 3 कृषि विधेयकांना शेतकऱ्यांकडून जोरदार विरोध होताना दिसत आहे. विधेयकं लागू झाल्यानंतर किमान आधारभूत किंमत मिळणार नाही, अशी शेतकऱ्यांना भिती वाटत आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकरी आणि कृषी उत्पन्नासाठी मोदी सरकारने मंजूर केलेल्या विधेयकात एमएसपीची खरेदी सुरूच राहील, शिवाय शेतकऱ्याला विक्रीचे अनेक मार्ग खुले होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कुठल्याही गैरसमजला बळी पडू नये, असे आवाहन माजी कृषिमंत्री आणि भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे.
शेतकरी आणि कृषी उत्पन्नासाठी मोदी सरकार ने मंजूर केलेल्या विधेयकात एम एस पी ची खरेदी सुरूच राहील, शिवाय शेतकऱ्याला विक्रीचे अनेक मार्ग खुले होणार आहेत.
त्यामुळे शेतकरी बांधवांनी कुठल्याही गैरसमजला बळी पडू नये.#JaiJawanJaiKisan @narendramodi @nstomar @AgriGoI @BJP4Maharashtra pic.twitter.com/z9siPy6ZiI— Dr. Anil Bonde (@DoctorAnilBonde) September 19, 2020
अनिल बोंडे म्हणाले की, या विधेयकांमधून शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देण्यात आले आहे. याबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. या विधेयकांमुळे कोणतीही खरेदी थांबणार नाही. केंद्र सरकार नाफेडच्या मार्फत उत्पादनाची खरेदीकरणारच आहे.
महाराष्ट्र सरकारने कापसाच्या खरेदीचे नियोजन करावे. 2 ऑक्टोबरला महात्मा गांधींच्या जयंतीपासून खरेदी करणे आवश्यक आहे. ज्यामुळे खरेदी थांबणार नाही. तसेच गैर समज पसरवणे थांबवावे. या विधेयकामुळे एमसपी अंतर्गत खरेदी करणे थांबणार नाही.