मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि अन्य आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला आहे. अंतरिम जामीन मंजूर करण्यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि उच्च न्यायालयाला फटकारले. या प्रकरणात आज कोर्टाने हस्तक्षेप केला नाही तर आपण विनाशाच्या दिशेने जाऊ, असेही यावेळी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजपने ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती. आता गोस्वामींना जामीन मंजूर झाल्यानंतर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत.
Thank https://t.co/FyQKknV12B
Rule of law Upheld !
Travesty of justice cannot be allowed !
Personal liberty cannot be hostage to an individual/s personal ego or vested agenda !#Arnabisback— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 11, 2020
आशिष शेलारांनी #Arnabisback वापरत ट्विट केले की, धन्यवाद आदरणीय सर्वोच्च न्यायालय…कायद्याचे राज्य कायम आहे. न्यायाची थट्टा करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या अहंकार किंवा अजेंडासाठी वैयक्तिक स्वातंत्र्य ओलीस ठेवू शकत नाही.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने आज 50 हजारांच्या जातमुचलक्यावर अर्णब गोस्वामींना तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले. यावेळी अर्जावर सुनावणी करताना न्यायमूर्ती डॉ. डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांनी राज्य सरकार आणि उच्च न्यायालयाला चांगलंच फटकारले.