मुंबई : पुढील चार महिन्यात ठाकरे सरकारमधील सहा सहकारी जे वसुलीत सहभागी होते ते सीबीआरच्या दारात असतील, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. अँटिलिया स्फोटकांपासून फोन टॅपिंगपर्यंत पोहचलेल्या प्रकरणात सीबीआयने रश्मी शुक्ला यांचा जबाब घेतला आहे, या पार्श्वभूमीवर बोलतान सोमय्या यांनी हा दावा केला.
किरीट सोमय्या म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि त्यांचं सरकार आता भयंकर भयभीत आहे. सीबीआयने रश्मी शुक्ला यांचा जबाब घेतला आहे. एफआयआरमध्ये अनिल परब यांचाही उल्लेख आला आहे, म्हणूनच ठाकरे सरकारमधील सहा मंत्री सीबीआयच्या निमंत्रणाची वाट पाहत आहेत.
परमबीर सिंग, रश्मी शुक्ला आणि सचिन वाझे यांच्यावर दबाब आणण्याचं काम ठाकरे सरकार करत असल्याचा आरोप देखील सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी कल्याण येथे खासगी आणि सरकारी कोव्हिड रुग्णालयांची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
पुढील 4 महिन्यात ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील आणि सहयोगी सहा सहकारी जे वसुलीत सहभागी होते ते सीबीआरच्या दारात असतील, असा दावा देखील सोमय्या यांनी केला.