मुंबई – मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक जिंकण्यासाठी गुजराती मतदारांना साद घालणाऱ्या शिवसेनेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. सिंधुदुर्गात 2 ग्रामपंचायती आणि 61 सदस्य तर रत्नागिरीत 121असे एकुण भाजपाचे 2 ग्रामपंचायतीसह 182 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोकणातील मतदारांना गृहीत धरण्याच्या शिवसेनेच्या वृत्तीवर ताशेरे ओढले. ‘कोकण म्हणजे आम्हीच’, असा अहंकार असणाऱ्या पक्षाचे वस्त्रहरण सुरु झाल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी शेलार यांनी शिवसेनेच्या ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ या नव्या टॅगलाईनविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर आशिष शेलार यांनी, मुंबई-ठाण्यात मालवणी खाजा भी आमचो अन् जलेबी-फापडा भी आपडो’, अशी टिप्पणी केली.
सिंधुदुर्गात 2 ग्रामपंचायती आणि 61 सदस्य तर रत्नागिरीत 121असे एकुण भाजपाचे 2 ग्रामपंचायतीसह 182 सदस्य बिनविरोध आले. अजून निवडणूक बाकी आहेच..
कोकण म्हणजे आम्हीच..अशा अहंकारी पक्षाचे "वस्त्रहरण" सुरु झाले रे महाराजा!
आता मुंबई-ठाण्यात मालवणी खाजा भी आमचो अन् जलेबी-फापडा भी आपडो!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 6, 2021
तसेच आशिष शेलार यांनी काँग्रेसवर देखील निशाण साधला. “महाविकासआघाडी सरकारमध्ये सकाळ-संध्याकाळ राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून लाथाबुक्क्या खाणे एवढेच काम आता काँग्रेसला उरले आहे. त्यामुळे भविष्यात काँग्रेस पक्षाचे विघटन होण्याचा धोका आहे. आता हे विघटन शिवसेनेमुळे होतंय का, याकडे काँग्रेसने लक्ष द्यावे”, असे आशिष शेलार यांनी म्हटले.