मुंबई : आयपीएलच्या पर्शवभूमीवर भाजपने सत्कारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.“राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ठाकरे सरकारचा ऑनलाईन जुगाराला अधिकृत करुन गरिबांची घरे उद्ध्वस्त करण्याचा डाव आहे. पैशांसाठी ठाकरे सरकार सुसंस्कृत महाराष्ट्राला जुगाराचा अड्डा करणार का? ” असा सवाल भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.
आयपीएल सुरु होत असलेल्या दिवशीच याची माहिती लोकांना होणे म्हणजे सध्या सुरु असलेल्या बेकायदेशीर ऑनलाईन बेटिंगला अभय देण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न आहे का? असाही प्रश्न भातखळकर यांनी उपस्थित केला आहे अतुल भातखळकर म्हणाले, “राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ऑनलाईन जुगाराला अधिकृत करणे कितीपत योग्य आहे यासाठी वित्त विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षेखाली समिती नेमून अहवाल मागविला होता. त्या अहवालानुसार राज्यात लवकरच जुगाराला अधिकृत करणार असल्याचे संकेत या सरकारने दिले आहेत. राज्याला यातून नाममात्र रक्कम मिळेल, परंतु त्यामुळे राज्यातील लाखो कुटुंब उद्ध्वस्त होतील. सरकारने याचा विसर पडू देऊ नये. राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्याची ही पद्धत अत्यंत चुकीची आहे.
राज्याचं करेत्तर उत्पन्न वाढवण्यासाठी इतर चांगले मार्ग शोधायचे सोडून सरकार गरिबांना उद्ध्वस्त करण्याचा मार्ग स्वीकारत आहे. यातून ठाकरे सरकारच्या नीतिमत्तेची पातळी दिसून येते. लॉटरी लागून सत्तेत आलेले हे सरकार जुगाराला पाठिंबा देणारच ना असा टोलाही अतुल भातखळकर यांनी महाविकासआघाडीला लगावला.
Read Also
CM ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विदर्भाकडे अजिबात लक्ष नाहीhttps://t.co/W9p951kWww#ChandrshekharBawankule #Bjp #Vidarbh @cbawankule
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 19, 2020