‘नवाब मलिक साहेब बोलणं सोपं आहे. शेतकऱ्यांना सहानुभूती दाखवणं सोपं आहे. परंतु प्रत्यक्षात ‘कानून के हाथ लंबे होते है, आपने वादा किया है तो निभाना पडेगा’. तुम्हाला शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना अटक करावी लागेल.असे वक्तव्य भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या ईगल बियाणे कंपनीवर कारवाई करण्याच्या मागणीवर भाजप नेते बबनराव लोणीकर आक्रमक झाले आहेत.
‘नवाब मलिक साहेब बोलणं सोपं आहे. शेतकऱ्यांना सहानुभूती दाखवणं सोपं आहे. परंतु प्रत्यक्षात ‘कानून के हाथ लंबे होते है, आपने वादा किया है तो निभाना पडेगा’. तुम्हाला शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना अटक करावी लागेल. कोर्टापुढे न्यावं लागेल. अन्यथा तुम्हाला प्रायश्चित म्हणून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल. तुम्ही जर त्यांना अटक केली, तर परभणीच्या मुख्य शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करेल,’ असे बबनराव लोणीकर म्हणाले.
‘जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ईगल बियाणे कंपनीवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. महाराष्ट्रात जिल्ह्या-जिल्ह्यात या कंपनीविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. ईगल कंपनीच्या मालकाला अटक करण्यासाठी परभणी पोलिसांनी एक विशेष पथकं तयार केलं आहे. हे पथक इंदोरला जाऊन आरोपी मालकाला अटक करणार आहे. स्वतः नवाब मलिक यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली.’