मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी सांगा गरिबांनी जगायचं कस? 14 एप्रिलपासून संचारबंदीच्या नावाखाली लॉकडाऊन लागू केला त्यावेळी जे पॅकेज जाहीर केले त्याचे काय झाले सांगा. आता आणखी पंधरा दिवस लॉकडाऊन वाढवला आहे, सामान्यांनी कसे जगायचे सांगा ?, असा सवाल भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना केला आहे.
राज्यात कोरोना व्हायरस संसर्गाची साखळी तोडण्यासाठी 15 मे पर्यंत निर्बंध वाढविण्यात आले आहे. याआधी कडक निर्बंधांची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी काही पॅकेजची घोषणा देखील केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा निर्बंधांची तारीख वाढविण्यात आल्याने केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे.
५ लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी 1500 रुपये तर 12 लाख रिक्षाचालकांना प्रत्येकी 1500 रु देण्याचे जाहीर केले होते. कितीजणांना प्रत्यक्ष मदत दिली सांगा.
अपयश झाकायला कांगावा वअकांडतांडव पण जनतेला मदत करायचे म्हणल्यावर हे सरकार कोडगे बनते. दुर्बल घटकांना मदत करायची सरकारचीइच्छाच नाही..३— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 30, 2021
5 लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी 1500 रुपये तर 12 लाख रिक्षाचालकांना प्रत्येकी 1500 रु देण्याचे जाहीर केले होते. कितीजणांना प्रत्यक्ष मदत दिली सांगा. अपयश झाकायला कांगावा व अकांडतांडव पण जनतेला मदत करायचे म्हणल्यावर हे सरकार कोडगे बनते. दुर्बल घटकांना मदत करायची सरकारची इच्छाच नाही, असा आरोप उपाध्ये यांनी केला आहे.
संचारबंदीच्या नावाखाली लॉकडाऊन लागू केलेल्या निर्णयाला आज 15 दिवस उलटले तरी आधीच तुटपुंजी जाहीर केलेली मदत ही या वसुली सरकारला लाभार्थ्यांना देता आलेली नाहीये, अशी टीका उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर केली.