मुंबई : काँग्रेसकडून नवीन कृषी कायद्यांना जोरदार विरोध केला जात आहे. काँग्रेसशासित राज्यांमध्ये हे कायदे लागू न करण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी कृषी कायद्याविरोधात पंजाबमध्ये रॅली काढली. मात्र या आंदोलनात तकऱ्यांच्या उपस्थितीबद्दल शंका उपस्थित केली आहे. यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्येसुद्धा तोंडावर आपटणार, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे. निलेश राणेंनी ट्विट केले की, राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार. कृषी बिलाची चर्चा सभागृहात होत असताना राहुल गांधी परदेशात होते, शेतकऱ्यांना त्यांचं हित बरोबर कळतं. राहुल गांधींच्या ‘शेती वाचवा’ आंदोलनात, सभांमधून शेतकरी मात्र गायब!
दरम्यान, सत्तेत आल्यावर कृषी कायदे रद्द करणार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.