अहमदनगर : मराठा आरक्षणावरून मराठा समाजाच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली असताना आता धनगर आरक्षणावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवा अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा भाजप नेते राम शिंदेंनी दिला आहे.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात ठोस पावले उचलली आहेत. तसेच राज्याच्या विधिमंडळामध्ये कायदा आणला. तो कायदा हायकोर्टामध्ये टिकला. मात्र राज्यामध्ये सत्तापरिवर्तन झाल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायलयात गेले. मात्र त्याठिकाणी राज्य सरकार आपली बाजू मांडण्यासाठी अपयशी आणि कमकुवत ठरल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे.”
“त्याचबरोबर धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न देखील गंभीर स्वरूप धारण केलं आहे. लोकांनी मोठं-मोठी आंदोलन केली. धनगर आरक्षणाचा प्रश्न मराठा आंदोलनामध्येच सुटला पाहिजे. नाहीतर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
Read Also :