मुंबई : राज्यात मॉल्स, दारूची दुकाने, रेल्वे, बससेवा सुरू करण्यात आली, यासह जवळपास सर्वच ठिकाणचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत, परंतु राज्यातील धार्मिक स्थळे मात्र भाविकांसाठी खुली करण्यात आलेली नाहीत. राज्यातील जनतेचा असंतोष वाढत असून जन भावनेचा आदर करत भाविकांसाठी धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
राज्यातील कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत घट होत असून हळूहळू जीवन पूर्वपदावर येत आहे. अनलॉक च्या विविध टप्प्यामध्ये आता जवळजवळ सर्वच निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. परंतु दुर्दैवाने अनेकांची श्रध्दास्थाने असलेली धार्मिक स्थळे मात्र बंदच आहेत. मुंबईतील लोकल ट्रेन म्हणजे गर्दीचा सर्वाधिक उच्चांक. ती देखील महिलांसाठी आता सुरू करण्यात आली आहे. अनेक तास एकत्र जवळ बसून बस, रेल्वे व विमानाचा प्रवास देखील राज्यभर चालू आहे. सरकारकडून सर्वांसाठी मुंबईत लोकल सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे, परंतु इतर राज्यातील धार्मिक स्थळे खुली असताना महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे मात्र खुली करण्यात येत नाहीत, हा विरोधाभास समाजण्या पालिकडे असल्याचे पाटील म्हणाले आहेत.
तसेच तिरुपती बालाजी, वैष्णोदेवी सारखी प्रमुख धार्मिक स्थळे नियम व अटींच्या अधीन राहून अनेक महिन्यांपूर्वीच भाविकांसाठी खुली करण्यात आलेली आहेत. तुळजापूर सारख्या राज्यातील अनेक शहरातील अर्थकारण धार्मिक स्थळाशी निगडित आहे. धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे अशा शहरातील अर्थव्यवस्था पूर्णतः कोलमडल्या आहेत. मास्क, सॅनिटायझर च्या वापरासह सोशल डिस्टनसिंगचे कठोर पालन करून मंदिरे सुरू करणे आता आवश्यक झाले आहे. असेही त्यांनी नमूद केले आहे.
Read Also
राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी मुख्यमंत्री राज्यपालांना सुपूर्द करणार
‘सीमा प्रश्नाचे भाजपला काही देणे नाही’; उदय सामंत यांनी टीका
ओबीसी आणि भटक्या समाजाच्या 10 हजार मुलांना NEET आणि JEE प्रशिक्षण : विजय वडेट्टीवार यांची घोषणा