मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी आरेतील जागा जंगल घोषित केल्यानंतर काल मुख्यमंत्र्यांनी दोन महत्वाच्या घोषणा केल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केलं यावेळी त्यानी कारशेडबाबत देखील महत्वाचे विधान केले आरेतील प्रस्तावित कारशेड आता कांजूरमार्गला होणार अशी घोषणा यावेळी त्यानी केली. मात्र यानंतर सामान्य मुंबईकर कारशेडची अजूनही झळ सोसत असल्याचे मत भाजप आमदार मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कांजुरची जमीन शून्य रुपये किंमतीने सरकारने दिलेली आहे. त्यावर आता मेट्रो कारशेड उभे राहणार आहे. आरे जंगलात साधारण 100 कोटींचा खर्च करून एक बिल्डींग उभारली आहे. ते पैसे वाया जाणार नाहीत. बिल्डींग अन्य कारणासाठी वापरणार आहोत. एकही पैसा वाया जाऊ देणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे.
मेट्रो कारशेड आरेहून कांजूरमार्ग येथे हलवण्याच्या निर्णयामुळे मुंबईकरांना अजून किती काळ मेट्रोची वाट पाहावी लागेल यावर कुठलीही स्पष्टता नाही ? असा सवाल मंगल प्रभात लोढा यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे ही जणू अनिश्चित काळासाठी स्थगिती आहे, असेच म्हणावे लागेल ! तसेच सामान्य मुंबईकर याची झळ सोसत आहेत असे स्पष्ट मत लोढा यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.
मेट्रो कारशेड आरेहून कांजूरमार्ग येथे हलवण्याच्या निर्णयामुळे मुंबईकरांना अजून किती काळ मेट्रोची वाट पाहावी लागेल यावर कुठलीही स्पष्टता नाही.
ही जणू अनिश्चित काळासाठी स्थगिती आहे, असेच म्हणावे लागेल!
सामान्य मुंबईकर याची झळ सोसत आहे!— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) October 12, 2020
Read Also
जिभेची तलवारबाजी लोकं फार काळ सहन करण्यासारखी स्थिती नाहीhttps://t.co/8zu4ulxzDX#Shivsena #ChhatrpatiSambhajiraje
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 12, 2020