मुंबई – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरआज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द ठरवलं आहे. सर्वोच्च न्यायालयात आज सकाळी साडेदहा वाजता सुनावणी सुरु झाली. सर्वोच्च न्यायालयाने 26 मार्चला निकाल राखून ठेवला होता. अॅड. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. मराठा आरक्षण रद्द करण्याचा हा निर्णय राज्य सरकारसाठी खूप मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचा नियोजित पद्धतीनं खून केल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार नितेश राणेंनी केला आहे. ‘या महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण चा नियोजित पद्धतीने खून केला आहे. सरकार आल्यापासून ही ठरवून केलेली हत्या आहे.. कसली तयारी नाही.. फक्त नाटक आणि ढोंगीपणा.. शेवटी छ. शिवाजी महाराजांनी जे शिकवून ठेवले आहे.. तोंड वाजवून न्याय भेटत नसेल.. तर तोंडात वाजवून न्याय मिळवा!!’, अशी घणाघाती टीका राणेंनी केली आहे.
या महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण चा नियोजित पद्धतीने खून केला आहे!!!
सरकार आल्यापासून ही ठरवून केलेली हत्या आहे..
कसली तयारी नाही.. फक्त नाटक आणि ढोंगीपणा..
शेवटी छ. शिवाजी महाराजांनी जे शिकवून ठेवले आहे..
तोंड वाजवून न्याय भेटत नसेल..
तर तोंडात वाजवून न्याय मिळवा!!— nitesh rane (@NiteshNRane) May 5, 2021
दरम्यान, वकील जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली होती. यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने 26 मार्चला निकाल राखून ठेवला होता. आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिला आहे.
तर दुसरीकडे न्यायालयानं निकाल दुर्दैवी असल्याची भावना मराठा समाजाच्या विनोद पाटील यांनी व्यक्त केली. या प्रकरणात न्यायालयात बाजू मांडत असताना अनेक चुका झाल्या, असं पाटील म्हणाले आहेत.