मुंबई : विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक आमदार विधानभवन परिसरात दाखल होऊ लागले होते, अनेकांचे कोरोना अहवान न मिळाल्याने आमदारांना विधानभवनात प्रवेश घेता आला नाही, त्यानंतर आमदारांना लवकर विधानभवनात सोडा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधिमंडळात जात असताना त्यांच्यासमोरच भाजप आमदारांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली, अजित पवारांनी घोषणा देणाऱ्या आमदारांशी यावेळी चर्चा देखील केल्याचे समजते.
वैद्यकीय प्रवेशातील ७०/३० कोटा आरक्षण रद्द करा या मागणीसाठी मराठवाड्यातील आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रवेश करत असताना भाजप आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचे दिसून आले.
आजपासून विधिमंडळाचे दोन दिवसीय अधिवेशन सुरु झाले आहे. त्यावेळी भाजपचे आमदार पहिल्याच दिवशी आक्रमक झाल्याचे दिसून आले. मराठवाड्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचे दिसून आले.
Read Also
कंगनाच्या मदतीला धावले केंद्र सरकार ! दिली ‘वाय’ दर्जाची सुरक्षाhttps://t.co/AoGZNmrdn6@KanganaTeam @rautsanjay61 @AmitShah
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 7, 2020