नवी दिल्ली : . सीमेवरील तणावावरून भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी श्वेतपत्रिका काढण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. सीमेवरील परिस्थिती जैसे थे करण्यासाठी युद्धच पर्याय असून, भारत त्यासाठी तयार आहे का?, असा सवाल सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला केला आहे.
सीमेवर निर्माण झालेल्या स्थितीवरून सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करून प्रश्न उपस्थित केले आहेत. “सीमेवर चीनसोबत सुरू असलेल्या संघर्षावर श्वेतपत्रिका काढण्यास काय अडचण आहे? पण सध्याची जी स्थिती आहे, ती नवीन परिस्थिती तयार होण्याच्या दिशेनं जात आहे. केवळ युद्धच योग्य पद्धतीनं परिस्थिती सुधारू शकते. त्यासाठी भारत तयार आहे का?,” असा सवाल स्वामी यांनी मोदी सरकारला केला आहे.
What is the difficulty in issuing a White Paper on the stand off with China? The difficulty is the truth about our present position which is heading for becoming a new status quo. Only a war can rectify it to status quo ante. Is India ready for it?
— Subramanian Swamy (@Swamy39) September 24, 2020
गलवान व्हॅलीपासून सुरू असलेल्या संघर्षावरून विरोधकांनी मोदी सरकार अधिवेशनात घेरण्याचा प्रयत्न केला होता. सीमेवरील परिस्थितीसंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी निवेदन केलं होतं. ज्यात ३८ हजार चौरस किमी भूप्रदेशावर चीननं कब्जा केला असल्याचं म्हटलं होतं.
Read Also :
MPSC पास झालेल्या ‘त्या’ उमेदवारांना नियुक्ती द्या !https://t.co/SzVVItZZ3I#RohitPawar #DattatrayBharane #ncpol
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 24, 2020