आपल्या विविध विधानाने नेहमी चर्चेत असणारे भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आणखी एका दाव्याने चर्चेत आले आहेत. २०२४ आणि २०२९मध्ये भाजपाची सत्ता येईल असे म्हणत त्यांनी भाजपला सूचना दिल्या आहेत
सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “२०२४ आणि २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा सत्तेत येईल. मात्र, भाजपाला जनादेशचा वापर ब्रिटिश राजशाहीने तयार केलेला भारतीय इतिहास सुधारण्यासाठी आणि येणाऱ्या पिढींमध्ये राष्ट्रवाद आणि हिंदुस्थानविषयी अभिमानाची भावना निर्माण करण्यासाठी केला पाहिजे.” तसेच, शिक्षक दिनानिमित्त हा माझा संदेश आहे, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी सुब्रमण्यम स्वामी यांनी एका निवेदनात म्हटले होते की, “एखाद्या देशाचा इतिहास त्याबद्दलच्या विदेशी तपशीलांवर आधारित असू शकत नाही आणि भारतीय लोकांसाठी पौराणिक सूत्रांना गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे. भारतीयांद्वारे घेतलेला भारताचा इतिहास आत्मसात करा.” सुब्रमण्यम स्वामींच्या म्हणण्यानुसार, हिंदुस्थान हा राज्यकारभाराची कला, दरबारीची शैली, युद्धाच्या पद्धती, शेती आधार देखभाल व माहितीचा प्रसार यामध्ये वैचारिकदृष्ट्या एक होता.