मुंबई : मुंबईत संचारबंदी लागू केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. मुंबईतील 144 कलम हे कोरोनामुळे नव्हे, तर मराठा समाजातील आंदोलनामुळे मुंबईत लावण्यात आहे ”, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी सरकारवर केला आहे.
मुंबईतील 144 कलम हे कोरोना मुळे नाही तर मराठा समाजातील आंदोलनामुळे मुंबईत लावण्यात आले आहे. मात्र, कलम लावून आंदोलनं दाबता येत नाहीत. तातडीची कॅबिनेट द्या, 1500 कोटी रुपये मराठा समाजासाठी घोषित करा. यावर्षी 642 कोर्सेस ना निम्मी फी सरकार भरणार हे घोषित करा, दहा लाखाचे कर्ज घेणाऱ्यांचे व्याज अण्णासाहेब पाटील महामंडळ भरते, ती संख्या वाढवा. व्याजाची तरतूद करा”, अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केली आहे.
“गेले तीन महिने व्याज भरलेली परतावा बँकेच्या खात्यात झालीच नाही आहे. सारथीची पूर्ण वाट लावलेली आहे. ती पुन्हा रिव्हाई करा. अजित पवार हे डायनामिक नेते आहेत. सरकारमध्ये मोठा प्रॉब्लेम हा निर्णयाच्या स्पीचचा आहे. निर्णय लवकर होत नाहीत. घोंगडी भिजत पडले, अजित पवारांकडे हा विषय आल्यामुळे त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावेत”, असंही ते म्हणाले.