पुणे : जनतेने तुम्हाला गांभीर्याने घेतले नाही म्हणून विधानसभेला तुमच्या 54 आणि आमच्या 105 जागा आल्या. आमच्या पक्षात फसवणूक, बेरकेपणा, पाठीत खंजीर खुपसणे या गोष्टी नाहीत, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हातात कागद न घेता वीज बिल या विषयावर भाषण करून दाखवावं, क्रॉस सबसिडी म्हणजे काय ते सांगावं.
5 वर्षं सत्तेत असताना भाजपने शिवसेनेवर अन्याय करण्याची भूमिका घेतली होती, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केली होती. या टीकेला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, जयंत पाटील म्हणतात भाजपला गांभीर्याने घेऊ नका. जनतेनं तुम्हाला गांभीर्याने घेतलं नाही म्हणून विधानसभेला तुमच्या 54 आल्या आणि आमच्या 105 जागा आल्या आहेत.
आमच्या पक्षात फसवणूक, बेरकेपणा, पाठीत खंजीर खुपसणे या गोष्टी नाहीत, असा टोला देखील त्यांनी लगावला.