मुंबई – पश्चिम बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर झाले. यात पश्चिम बंगालच्या निकालाची सध्या संपूर्ण देशभरात चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातही निकालावरून भाजपाला लक्ष्य करताना दिसत आहे. सत्ताधारी पक्षांकडून होत असलेल्या टीकेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकाल आणि पंढरपूर – मंगळवेढा पोटनिवडणूक निकलाच्या अनुषंगाने चंद्रकांत पाटील यांनी महाविकासआघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला थेट आव्हान दिलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी एक ट्विट केलं आहे.
“महाराष्ट्रात माझे आव्हान आहे, कोणत्याही निवडणुकीत चारही पक्षांनी वेगवेगळं लढून पाहावं, मग सर्वांना कल्पना येईल की कोणाला किती बोलण्याची पात्रता आहे. तीनही पक्ष एकत्रित असून, सुद्धा पंढरपुरात आमचा पराभव करू शकले नाहीत, मग हे वेगवेगळे लढले, तर भाजपासमोर यांचा निभावही लागणार नाही,” असे चंद्रकांत पाटील यांनी महाविकासआघाडीला प्रत्युत्तर दिलं आहे.
महाराष्ट्रात माझे आव्हान आहे… कोणत्याही निवडणुकीत चारही पक्षांनी वेगवेगळे लढून पाहावे, मग सर्वांना कल्पना येईल की कोणाला किती बोलण्याची पात्रता आहे. तीनही पक्ष एकत्रित असून सुद्धा पंढरपुरात आमचा पराभव करू शकले नाहीत, मग हे वेगवेगळे लढले तर भाजपासमोर यांचा निभावही लागणार नाही. pic.twitter.com/BxEUX3gWk0
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) May 3, 2021