गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्यात आले होते. हे कलम पुन्हा लागू करावं आणि विशेष दर्जा पुन्हा द्यावा, यासाठी जम्मू-काश्मीरमधील भाजप वगळता इतर पक्ष एकत्र आले आहेत. काँग्रेससह काश्मिरमधील 6 पक्षांनी जाहीरनामा जाहीर करत जम्मू-काश्मीरला पुन्हा विशेष दर्जा द्यावा अशी मागणी केली आहे. काँग्रेस नेते पी. चिदंबदरम यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे. यावरून आता भाजप महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
काँग्रेस सुधरणार नाही… देशाच्या एकतेला आणि अखंडतेला नुकसान पोहोचवण्याचे प्रत्येक संभाव्य प्रयत्न ते करतच राहतील. pic.twitter.com/c5KW7oC3MK
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) August 23, 2020
काँग्रेस सुधारणार नसून, देशाच्या एकतेला आणि अखंडतेला नुकसान पोहोचवण्याचे प्रत्येक संभाव्य प्रयत्न ते करतच राहतील, असा घणाणात त्यांनी केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवर निशाणा साधत प्रश्न विचारला की, त्यांनी जम्मू-काश्मीर या राज्याला भारतापासून वेगळे ठेवायचे आहे का ? जम्मू-काश्मीर भारताचा भाग नाही का ? जम्मू-काश्मीर आणि देशातील इतर राज्यांमध्ये नेहमी फरक हवाय का ? पाटील म्हणाले की, काँग्रेस आणि पाकिस्तानची भाषा अगदी जुळत आहे. काँग्रेसने भारत मातेच्या पाठीत सुरा खुपसणे बंद करावे, नाहीतर संपुर्ण देश काँग्रेसच्या विरुद्ध संघर्ष करून त्यांचा समूळ नायनाट करेल.