जिल्ह्याची परिस्थिती गंभीर झाली असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा निष्क्रिय पालकमंत्र्याना बदलून धडाडीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे पालकमंत्रीपद सोपवावं, अशी मागणी माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केली होती. यावर पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
पालकमंत्री बदलणं म्हणजे पेट्रोल पंपावरील कामगार बदलण्यासारखं नाही, असं म्हणत सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत धनंजय महाडिक यांच्यावर जोरदार टीकेचे बाण सोडले आहेत.
माझ्यावर निष्क्रियतेचा टीका करताना धनंजय महाडिक यांनी त्यांचा लोकसभा निवडणुकीत पावणे तीन लाख मतांनी पराभव झाला होता हे पाहावे. यावरुन ते किती सक्रिय होते हे स्पष्ट होते.त्यामुळेच नागरिकांना त्यांना निष्क्रिय ठरवलं, असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.