मुख्यमंत्री ठाकरे सकाळी 8 वाजता मातोश्री निवासस्थानावरुन सोलापूरसाठी रवाना झाले. मुंबईवरुन त्यांच्यासोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरातही उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे आणि महसूलमंत्री थोरात हे विमानाने सोलापूरला पोहोचले.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटपही केले. 11 नुकसानग्रस्तांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोलापुरात धनादेश देण्यात आले. तसेच त्यानंतर दुपारी तीन वाजता आढावा बैठक घेणार आहेत. नुकसानग्रस्त भागासाठी मुख्यमंत्री काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरासन केले. नुकसानाबद्दल त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. “राजकारण करायचं नाही. केंद्राकडे राज्याचं देणं बाकी आहे. ती मदत आली तर मदतीची गरज पडणार नाही. येणं आलं तर हात पसरावं लागणार नाही. विरोधकांनी त्यावर राजकारण करत बसू नये. शेतकऱ्यांसाठी जे जे करावं लागेल ते करू. दोन-चार दिवस दौरे करणार आहे. माहिती घेत आहे. त्यानंतर शक्य तेवढी मदत करू. हे तुमचं सरकार. शेतकऱ्यांचं सरकार , वाऱ्यावर सोडणार नाही” अशा शब्दात त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूर दौऱ्यानंतर बुधवारी (21ऑक्टोबर) उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्ष विभागाने मुख्यमंत्री हे बुधवारी उस्मानाबाद जिल्हा दौरा करणार असल्याची माहिती दिली.
Read also :
“हे तुमचं सरकार, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही”; मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन https://t.co/tR1iplro1X
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 19, 2020