मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर येथे महिलांवर झालेल्या बलात्काराच्या घटना दुर्दैवी आहेत. महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार काय कुणी वाकड्या नजरेने पाहिले तरीही सहन होणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. आता मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाराष्ट्रात घडणाऱ्या घटनांचा पाढा वाचला आहे.
साहेब, महाराष्ट्रात देखील रोज घटना घडत आहेत, अद्याप एसओपी बनवलेली नाही. महाराष्ट्र सहन करतोय, असे म्हणत चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर घणाघात केला आहे.
साहेब,
महाराष्ट्रात रोज घटना घडताहेत. कालपासूनच्या सांगू
नगरला पोलिसाचा महिलेवर बलात्कार. नागपूरात सामुहीक बलात्कार
विक्रोळीत मुलीचा मृतदेह गटारात
आज नागपूरात पोलिसाचा महिलेवर बलात्कार.
कोविडसेंटरचे अत्याचार वेगळेच ज्यासाठी तुम्ही अजुनही SOP नाही बनवली महाराष्ट्र सहन करतोय साहेब pic.twitter.com/631l9oE1aI— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 1, 2020
चित्रा वाघ यांनी ट्विट केले की, साहेब महाराष्ट्रात रोज घटना घडताहेत. कालपासूनच्या सांगू…नगरला पोलिसाचा महिलेवर बलात्कार. नागपूरात सामूहिक बलात्कार, विक्रोळीत मुलीचा मृतदेह गटारात, आज नागपूरात पोलिसाचा महिलेवर बलात्कार. कोविडसेंटरचे अत्याचार वेगळेच. ज्यासाठी तुम्ही अजुनही SOP नाही बनवली. महाराष्ट्र सहन करतोय, साहेब.
दरम्यान, हाथरस प्रकरणावरून योगी आदित्यनाथ यांच्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टीका केली होती. या टीकेला देखील प्रत्युत्तर देत चित्रा वाघ यांनी महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेची आठवण करून दिली होती.