मुंबई : मुंबईच्या मेट्रो-3 प्रकल्पाची कारशेड आता आरे कॉलनीऐवजी कांजूरमार्ग इथे उभारली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्ष जोरदार टीका केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय अंहकारातून घेतला असल्याची टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
Metro car shed at #Aarey now will be shifted to Kanjurmarg without any extra cost. There were a lot of protests to save the environment, hence a committee was formed to look into the project, & Kanjurmarg was suggested.@CMOMaharashtra #AareyForest #AareySaved #MahaGovtCares pic.twitter.com/4JAs4SE7SF
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 11, 2020
मेट्रो कारशेड आरेऐवजी कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय कांजूरमार्गमध्ये हलविण्यात येणार आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी मोठे आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर या प्रकल्पासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली व त्यांनीच कांजूरमार्ग हा पर्याय सुचवल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
मलिक म्हणाले की, कांजूरमार्गमध्ये येथे प्रकल्प हलवल्याने कोणत्याही अतिरिक्त खर्चात वाढ होणार नाही हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितली आहे. राज्यात, देशात विकास व्हावा. मात्र त्यासोबत पर्यावरणाची देखील काळजी घेणे गरजेचे आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांनी पर्यावरण व जनहिताचा निर्णय घेऊन रास्त निर्णय घेतला आहे.