मुंबई : राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून प्रार्धनस्थळे उघडण्याचे आवाहन केले होते. त्याला मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून खास ठाकरे शैलीत राज्यपालांचा समाचार घेतला आहे. या पत्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांचे हिंदुत्व तसेच सरकार करत असलेली कोरोनाबाबतची कामे याबाबत भाष्य केले आहे.विशेष म्हणजे या पत्राममधून मुख्यमंत्री ठाकरे यांनी अभिनेत्री कंगना तसेच राज्यपालांनी इतर गोष्टीबाबत घेतलेल्या भूमिकांचा थेट ठाकरी शैलीमध्ये समाचार घेतल्याचे पहायला मिळते.
पत्रामध्ये मुख्यमंत्री म्हणतात महोदय आपले दिनांक १२।१०।२० रोजीचे इंग्रजीमध्ये पाठवलेले प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. या बद्दल सरकार जरूर विचार करत आहे.जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे, आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. करोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सद्ध्या राज्यात ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी ‘ हि मोहीम राबवली जात आहे. आरोग्यविषयी सुचना देणे , जनजागृती करणे , आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी व उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॅाक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स , आंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी या पत्राद्वारे दिली आहे.
काय म्हणालेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं ‘या’ पत्रामध्ये
महोदय आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही.माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणार्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही.
Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा ? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि नउघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का ? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का ? असा जळजळीत सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना केला आहे.
मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का ? असाही प्रश्न आपणांस पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल मात्र मी एवढा थोर नाही . इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे.
आपण म्हणतां गेल्या ३ महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील ३ पत्रे आपण सोबत जोडली आहेत. हि तिनही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभिर्याने विचार करत असून सर्व काळजी घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल हि खात्री मी आपल्याला देतो. असे म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांचा चांगलाच समाचार घेतल्याचे दिसून येते.
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मा. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी जी यांच्या पत्राला उत्तर दिले आहे. pic.twitter.com/8duuQl45tV
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) October 13, 2020
Read Also
राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे म्हणतात,मोदी सरकारच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत…https://t.co/JwU3rpYei7#NCP #PMModi #SunilTatkare #ModiSarkar@SunilTatkare @PMOIndia @narendramodi @NCPspeaks
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 13, 2020