चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबाच्या जंगलाती वाघांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या जंगलात जवळपास 160 वाढ असून, वाघांच्या वाढते संख्येमुळे त्यांची नसबंदी करण्याचा प्रस्ताव वन विभागाने ठेवला होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा प्रस्ताव नाकारला आहे.
वाघांची नसबंदी कोणत्याही परिस्थितीत केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धठ ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. वाघांचे स्थलांतर राज्यात अन्यत्र वा अन्य राज्यांमध्ये करण्यासंदर्भात विचार करण्यासाठी तज्ज्ञ व अधिकाऱ्यांचा अभ्यासगट नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वन्यजीव मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
येथील वाढत्या वाघांच्या संख्येमुळे अनेकदा मनुष्य-वन्यजीव संघर्ष होतो. वाघांची नागपूर येथील प्राणी संग्रहालयात रवानगी करावी किंवा काही वाघांची नसबंदी करावी, असा प्रस्ताव वनविभागाकडून सादर करण्यात आला होता. मात्र, नसबंदी हा उपायच असू शकत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.