मुंबई : आरेमधली 600 एकर जमीन ही जंगल म्हणून घोषीत करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल दिली.गेल्या वर्षी आरे जमिनीवरील जंगल आणि सरकारमध्ये फार मोठा संघर्ष झाल्याचे दिसून आले होते. मात्र आता ठाकरे सरकारने आरे बाबत घेतलेल्या या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून स्वागत करण्यात आल्याचे दिसून येते.
“आरे” ची ६०० एकर जमीन जंगल म्हणून राखून ठेवल्याचं वाचलं. हा निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन. अशा आशयाचे ट्विट मनसे नेते अनिल शिदोरे यांनी केले आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं हा विषय पहिल्यापासून लावून धरला होता आणि आंदोलनं देखील केली होती असे देखील शिदोरे यांनी यावेळी म्हंटले आहे.
"आरे" ची ६०० एकर जमीन जंगल म्हणून राखून ठेवल्याचं वाचलं. हा निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन.. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं हा विषय पहिल्यापासून लावून धरला होता आणि आंदोलनं केली होती ह्याचं ह्यावेळी स्मरण झाल्याशिवाय रहावत नाही.. @CMOMaharashtra #मुंबई
— Anil Shidore (@anilshidore) September 3, 2020
मुख्यमंत्र्यांनी आरे संदर्भात काल एक बैठक घेतली या बैठकीला आरे, वन आणि पर्यावरण मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते. भारतीय वन कायद्याच्या कलम 4 नुसार राज्य सरकार आरेमधली 600 एकर जागा जंगल म्हणून घोषीत करणार आहे. त्यामुळे इथल्या आदिवासींचे हक्का कायम राखले जातील असंही त्यांनी सांगितलं.
राखीव वन क्षेत्राचा निर्णय घेताना आदिवासी समुदाय तसेच इतर संबंधितांचे योग्य हक्क अबाधित ठेवावेत असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. याचबरोबर येथील झोपड्यांचे पुनर्वसनही तातडीने सुरू केले जाईल. या संपूर्ण कार्यवाहीच्या पहिल्या टप्प्याचा प्रस्ताव हा वन विभागामार्फत लवकरच सादर करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच आरे येथील वनसंपदा संरक्षित होणार आहे.