मुंबई ; हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं सरकार सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहे. हाथरस प्रकरणासह उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवरून योगी सरकारला सवाल केले जात आहे. पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यास रोखल्यानंही सरकारवर टीका होत आता महाराष्ट्र काँग्रेसने योगी सरकारला खडे बोल सुनावत राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले आहे.
हाथरस प्रकरणाचे संतप्त पडसाद देशभरात उमटत आहेत. राजकीय नेत्यांकडून पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, सरकारकडून त्याला विरोध केला जात आहे. राजकीय नेत्यांवर लाठीमार केल्याचे प्रकार घडले. विशेष म्हणजे माध्यमांना भेट घेण्यापासून रोखण्यात आलं होतं. हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियाला न्याय देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ #SatyagrahaForOurDaughters आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात काँग्रेसच्या आंदोलनांना राज्यात सर्वदूर मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियाला न्याय देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ #SatyagrahaForOurDaughters आंदोलन करण्यात आले. pic.twitter.com/7gxlRyPKJH
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) October 5, 2020
उत्तर प्रदेशमधील हाथरस प्रकरण देशात प्रचंड गाजत आहे. उत्तर प्रदेश सरकार आणि प्रशासनावर ताशेरे ओढले जात आहेत. महिलांच्या सुरक्षेकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधक आणि महिला कार्यकर्ते सरकारवर करत आहेत. उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील घटनेने देश हादरला असून आता त्यावरून देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिक्रिया उमटत आहेत.
हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियाला न्याय देण्याच्या मागणीसाठी परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाध्यक्ष, आमदार सुरेश वरपुडकर यांच्या नेतृत्वाखाली परभणी येथे #SatyagrahaForOurDaughters आंदोलन करण्यात आले. pic.twitter.com/Uxmb5rBqsF
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) October 5, 2020
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी आणि कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी वाड्रा हाथरसमधील पिडीत कुटुंबातील लोकांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना रस्त्यावर अडवून उत्तर प्रदेश पोलीसांनी धक्काबुक्की केली आहे. त्यानंतर ते काल हाथरस गेले होते. तिचे जाऊन त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. दरम्यान काल प्रियांका गांधींवर पोलिसांनी केलेल्या गैरवर्तनामुळे देशातील अनेक नेते सरकारवर टिका करत आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे १९ वर्षीय मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार व त्यानंतर तिचा करण्यात आलेला अमानुष खुनामुळं सध्या देशात संतापाची लाट आहे.
हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी ठाणे शहर(जिल्हा)काँग्रेस कमिटीतर्फे #SatyagrahaForOurDaughters आंदोलन करण्यात आले. pic.twitter.com/z8V1MshteP
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) October 5, 2020
हाथरस बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळत असून युपी पोलिसांच्या वागणुकीवरून योगी सरकारवर टीका होत होती. त्यानंतर योगी सरकारने या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. या अगोदर आज उत्तर प्रदेशच्या गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव अवनीश अवस्थी व डीजीपी हितेशचंद्र अवस्थी यांनी या कुटुंबाची भेट घेतली. दोषींना कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल, असे आश्वासन अवस्थी यांनी या घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांना दिले होते.
पीडित मुलीचे गाव बुलगढीला पोलिसांनी वेढा घातला असून गावाची पूर्ण नाकाबंदी करण्यात आली आहे. गावाबाहेरील कोणालाही आत सोडले जात नाही. पोलिसांच्या बंदोबस्तामुळे गावकरीही बाहेर येऊ शकत नाहीत, असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. विशेष तपास पथक चौकशी करत असून त्यात अडथळे येऊ नयेत, यासाठी कोणालाही गावात जाऊ दिलेले नाही, असे स्पष्टीकरण पोलीस उपमहासंचालक प्रवनकुमार यांनी दिले. पीडित मुलीच्या नातलगांशी दूरध्वनीवरूनही बोलू दिले जात नसल्याचा आरोप नेत्यांकडून केला जात आहे.
Read Also :
नेमकं कोण कुणाबरोबर?
https://t.co/YhkLKLvO1d @Dev_Fadnavis @ChDadaPatil @AjitPawarSpeaks @bb_thorat @AshokChavanINC @mieknathshinde @sachin_inc @BhatkhalkarA @ChitraKWagh @MiAtik01
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 5, 2020