उत्तरप्रदेश : हाथरस प्रकरणावरून आता देशात राजकारण तापू लागले असून सोशल मीडियावर लोक देखील आपला आक्रोश व्यक्त करत आहेत. दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयातच या पीडितेवर उपचार सुरू होते. त्या रुग्णालयाबाहेरही लोकांनी निदर्शने केली. तसेच लोकांनी मेणबत्ती मोर्चा देखील काढला. दरम्यानच्या काळात उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणीही आता होऊ लागली आहे. काँग्रेस पक्षाने तर पंतप्रधानांच्या या प्रकरणावरील मौनावरही प्रश्न उपस्थित केला आहे. उत्तर प्रदेशात एका विशिष्ट वर्गाचे जंगलराज असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.
उत्तरप्रदेशातील हाथरस येथे १९ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्काराची मन हेलावणारी घटना घडली. पीडित तरुणीचा काल (२९ सप्टेंबर) दुर्दैवी मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात पीडित तरुणीवर उपचार सुरु होते. ही तरुणी १४ सप्टेंबरपासून मृत्यूशी झुंज देत होती. ४ जणांनी या तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या तरुणीच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशमधील वातावरण चांगलेच तापले असून आरोपींना कठोर शिक्षा केली जावी अशी मागणी संपूर्ण देशभरातून केली जात आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांच्या भूमिकेबद्दलही संक्षय व्यक्त केला जात आहे. यावरुनच आता काँग्रेसने उत्तर प्रदेश पोलीस आणि उत्तरप्रदेशमध्ये सत्तेत असणाऱ्या भाजप सरकारवर टीका केली आहे. भाजपाचे हे सरकार असे क्रूर का आहे?, असा प्रश्न काँग्रसने ट्विटरवरुन उपस्थित केला आहे.
यूपी में 19 वर्षीय दलित बेटी के साथ सामूहिक बलात्कार और क्रूर हत्या कानून व्यवस्था की पोल खोल रहा है। उत्तर प्रदेश में बहन-बेटियां असुरक्षित हैं।
उत्तर प्रदेश सरकार कार्रवाई के नाम पर लीपापोती कर अपराधियों को संरक्षण देती है। #YogiResignNOW pic.twitter.com/fPRZO9zJCD
— Congress (@INCIndia) September 30, 2020
“उत्तर प्रदेशमधील १९ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिची क्रूर हत्या करण्यात आली असून यावरुन पोलीस व्यवस्थेचा खोटारडेपणा उघड होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये महिला, मुली असुरक्षित आहेत. उत्तर प्रदेश सरकार कारवाईच्या नावाखाली केवळ स्वत:चा बचाव करत आरोपींना संरक्षण देते,” असं काँग्रेसने म्हटलं आहे. काँग्रेसने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी केली आहे. १० दिवस कोणालाही अटक करण्यात आली नाही, पीडितेच्या कुटुंबाला अंत्यसंस्कारामध्ये सहभागी होऊ दिले नाही, उत्तर प्रदेश पोलिसांनी कुटुंबाच्या परवानगीशिवाय पार्थिव ताब्यात घेत अंत्यसंस्कार केले असे तीन मुद्दे मांडत भाजपाचे हे सरकार असे क्रूर का आहे?, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला.
दरम्यान या घटनेचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले आहेत, महाविकासआघाडी सरकार मधील मंत्र्यांनी भाजपवर आरोप केले तर भाजप नेत्यांनी यास प्रत्युत्तर दिले आहे. उत्तरप्रदेशमध्ये योगीजी ज्यापध्दतीने सरकार चालवत आहेत यावरून ते त्यांच्या सहकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना खुली सुट देत आहेत. हाथरसमध्ये दलित बालिकेवर सामुहिक बलात्कार झाला. त्यानंतर तिची हत्या झाली. सुरुवातीला फेक न्यूज आहे असं काही घडलंच नाही म्हणणार्या योगी सरकारने त्या बालिकेवर रातोरात अंत्यसंस्कार का केले. यातून स्पष्ट होते की उत्तरप्रदेशमध्ये कायद्याचं राज्य राहिलेले नाही असेही नवाब मलिक म्हणाले.
उन्नावमध्ये सेंगरला वाचवण्याचा प्रयत्न झाला तसा या केसमध्ये आणि यासारख्या अनेक केसेस उत्तरप्रदेशमध्ये आहेत. ज्यांना सरकार वागणूक देत आहे असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. दरम्यान हाथरसप्रकरणी पंतप्रधानांना दु:ख झाले असेल तर योगींचा तात्काळ राजीनामा घेवून सरकार बरखास्त करावे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
Read Also :
मोदींना हाथरस घटनेवरून दु:ख झाले असेल तर योगी सरकार बरखास्त करावं- मंत्री नवाब मलिकhttps://t.co/8xDtfpLlPE @nawabmalikncp @NCPspeaks @CMOMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 30, 2020