नागपूर : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या घटनेमुळे संपूर्ण देशभरात संतापाचं वातावरण आहे. या घटनेत पोलिसांच्या भूमिकेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, त्यावरुन आता उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर चहुबाजूने टीका होऊ लागली आहे. महाविकास आघाडीतील ऊर्जा मंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी या सर्व प्रकरणावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
हाथरस येथे घडलेल्या विकृत कृत्याच्या संपूर्ण देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच आता नितीन राऊत यांनी युपी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. रात्रीच्या काळोखात संविधानाची हत्या करत युपी पोलिसांकडून हाथरस येथिक पीडित मुलीचे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यामुळे योगी आदित्यनाथ यांना आपल्या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही असे राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हंटले आहे.
नितीन राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना टॅग करत या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.देशभरातून या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नितीन राऊत यांनी आपल्या ट्विट मध्ये #ResignYogiAdityanath हा हॅशटॅग वापरात योगी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
रात के अंधेरे में संवैधानिक अधिकारों की हत्या करते हुए UP पुलिस द्वारा हाथरस की बेटी का अंतिम संस्कार किया गया। @myogiadityanath को अपने पद पर रहने का अधिकार नहीं है, उन्हें इस्तीफा दे देना चाहिए। @AmitShah इस केस में हम CBI जांच की मांग करते है। #CBI4Hatras #ResignYogiAdityanath
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) September 30, 2020
Read Also
पवारांना ‘हे’ झेपणार नाही कारण ते कोलांट्या मारण्याइतकं सोपं नाहीhttps://t.co/yl8SNwbXwM#MarathaResevation #SharadPawar @BhatkhalkarA
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 30, 2020