अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. विरोधकांकडून आरोप होत होते. त्याकडे आदित्य ठाकरे यांनी दुर्लक्ष केले होते मात्र काही दिवसांपूर्वी आदित्य यांनी तात्काळ एक पत्रक काढून विरोधकांच्या आरोपाला प्रतिउत्तर दिले आहे .
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर होणाऱ्या आरोपावर महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी उत्तर दिले आहे.
आदित्यजी, चिंता करू नका. सुशांतप्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलीस सक्षम आहे की बिहार पोलीस हे शेंबडं पोरगंही सांगेल, असा टोला ट्विटरच्या माध्यमातून सत्यजित तांबे यांनी लगावला आहे. तसेच आपण करत असलेले उत्तम कार्य सहन न होऊ शकणाऱ्यांचे हे गलिच्छ राजकारण आहे, अशी टीका सत्यजित तांबे यांनी केली आहे.
आदित्यजी, चिंता करु नका.
जनता हुशार आहे,
मुंबई पोलिस सक्षम आहे की बिहार पोलिस ? हे शेमडं पोरगं पण सांगू शकेल.
आपण करीत असलेले उत्तम कार्य सहन न होऊ शकणाऱ्यांचे हे गलिच्छ राजकारण आहे. https://t.co/FiGhwYNRS2— Satyajeet Tambe (@satyajeettambe) August 4, 2020