नवी दिल्ली : , ‘सरकार सत्तेच्या नशेत आहे. केंद्रीय कृषी मंत्री और गृहमंत्री 3 डिसेंबरआधी शेतकऱ्यांसोबत कोणतीही चर्चा होणार नाही असं म्हणत आहेत. या कडाक्याच्या थंडीत दोन्ही मंत्र्यांकडे शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी 5 दिवसांपर्यंत वेळच नाही, असा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केला आहे.
रणदीप सिंह सुरजेवाला म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीमंडळाशी चर्चा करायला हवी. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर सार्वजनिकपणे शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणतात आणि शेतकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करतात. यासाठी त्यांनी माफी मागावी. मोदी सरकार शेतकरी आपला शेतीमाल दुसऱ्या राज्यात नेऊन विकण्यासाठी सक्षम असल्याचं आणखी एक खोटं बोललं.
‘खरंतर भारतात 86 टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांकडे 5 एकरपेक्षा कमी जमीन आहे. यात 80 टक्के शेतकऱ्यांकडे केवळ 2 एकर जमीन आहे. त्यांच्याकडे आपला शेतीमाल आपल्या जिल्ह्याच्या बाहेर विकण्याची क्षमता नाही, तर ते दुसऱ्या राज्यात कसे विकणार?’