मुंबई: कोरोना संकट महामारी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.त्याच्यावर आता उच्च न्यायालयाने पण शिक्कामोर्तब केले आहे. त्यांनी यासंदर्भात नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. आता सुप्रीम कोर्टाने पण कोरोनाला राष्ट्रीय संकट जाहीर केले असून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे की,”केंद्र सरकारने कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी” अशी मागणी राऊत यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना म्हटले होते की कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करा. त्यावर न्यायालयाने पण शिक्कामोर्तब केले आहे. करोनाच्या संकटामुळे सर्वोच्च न्यायालय आणि हायकोर्ट अॅक्टिव्ह झालं आहे. करोना कोर्टापर्यंतही पोहोचला आहे. मला वाटत त्यांच्या घरापर्यंत कोरोना गेला आहे. कोर्ट झालंय, त्यामुळे देशाला नक्कीच काही ना काही फायदा होईल,’ अशी माहिती राऊत यांनी दिली आहे.
कोरोनाच्या काळात महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम करण्यात आले. पण कोरोनाच्या संकटात महाराष्ट्राने सर्वात चांगले काम केले. महाराष्ट्राच्या चांगल्या कामाची दखल आज न उद्या उच्च न्यायालय घेईलच. कोरोनामुळे महाराष्ट्रातील जनता घाबरून गेली आहे. महाराष्ट्राला आता मॉडेलप्रमाणे काम करावे लागेल. कोरोना आता न्यालयापर्यंत गेल्यामुळे न्यायालय पण सक्रिय झाले आहे असेही यावेळी राऊत यांनी म्हटले आहे.
महामारी काळात सर्वोत्तम काम महाराष्ट्रातच, मात्र राज्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला – संजय राऊत
महाराष्ट्रातील लसीकरणावरून, लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यावरून आणि लसींच्या किंमतीवरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात देखील या कारणावरून धुसफूस सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच, शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना, पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. महामारी काळात महाराष्ट्राला बदनाम करण्याचे खूप प्रयत्न झाले. मात्र या काळात सर्वोतम काम महाराष्ट्रातच होत आहे. त्यामुळे आता देशातही महाराष्ट्र मॉडेलप्रमाणेच काम करावे लागेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.