महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर हे दोघेही शनिवारी सोलापुरात कोरोनाविषयक आढावा बैठकीसाठी आले होते. त्यापूर्वी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक काँग्रेस कमिटीत घेतली
यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या समस्या मंत्र्यांसमोर मांडल्या. यामध्येच एका कार्यकर्त्यांने प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रारी घेऊन गेल्यानंतर कामे होत नसल्याचं सांगितले. यावर उत्तर देताना मंत्री यशोमती ठाकूर यांनी हे वक्तव्य केले आहे.
‘कामं होत नसतील तर दंगा करा. भीक मागितलं तर कोणी देत नाही, अधिकार हिसकावून घ्यावे लागतात. कोणत्याही तालुका अध्यक्षाने अशी तक्रार करु नये. तुम्हाला तालुका अध्यक्ष केलं आहे, तुमचा तालुका तुम्ही सांभाळला पाहिजे. त्याला ताकद देण्याचं काम आम्ही करु’ असे वक्तव्य महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं.