नागपूर : भारताच्या स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांना आपण ज्या बंधनात अडकवून ठेवलं होत त्या बंधनातून सरकारने शेतकऱ्यांना आता मोकळं केलं आहे. त्यासाठीच काल संसदेत शेतकरी बिल पास करण्यात आले असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून फडणवीस यांनी शेतकरी बिलाबाबत वक्तव्य केले आहे.
स्वतः पिकवलेल्या मालाला शेतकऱ्यांना अडत द्यावी लागते त्यामुळे काल जे विधेयक मंजूर करण्यात आले त्यातील एका विधेकामुळे एक देश एक मार्केट निर्माण करण्याची संधी मिळाली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
नेमकं काय म्हणाले फडणवीस यावेळी
शेकऱ्याने माल कोठे विकावा याची मुभा त्याला नव्हती.
या विधेयामुळे आता आंतरराज्यीय विक्री देखील ओपन झाली आहे.
या आधी इतर राज्यांचे कायदे वेगवेगळे असल्यामुळे माल विकताना अडचणी यायच्या.
आता एक मार्केट झाल्यामुळे शेतकरी माल कोठेही विकू शकतो.
विक्रीकरावर ८ % कर होता तो आता संपुष्टात आला आहे.
शेतकऱ्यांना हमीभाव सरकार देणारच आहे.
कंत्राटीपध्दतीने शेतमाल आता विकता येणार आहे.
कॉग्रेसने आक्षेप घेणे ही खूप मोठी लबाडी आहे.कारण कंत्राटी शेती संदर्भात केंद्राने जो कायदा केला आहे तो कायदा २००६ साली आघाडी सरकारने राज्यात तयार केला आहे आणि सध्या तो राज्यात लागू आहे आणि त्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.