मुंबई : इंदू मिल या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा पायाभरणी कार्यक्रम आयोजित करणं, लगेच तो रद्द करणं हे सगळं अनाकलनीय आहे असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
इंदू मिल या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारने पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी काही मोजक्या लोकांनाच निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र काही वेळातच हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यानंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच. आधी पंधरा वर्षे ज्यांचं सरकार होतं ते एक इंचही जागा मिळवू शकले नाहीत असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी सरकरवर केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जागा मिळाली त्यावेळी भूमिपूजनही झालं होतं. तरीही आज इंदू मिल या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा पायाभरणी कार्यक्रम आयोजित करणं, लगेच तो रद्द करणं हे सगळं अनाकलनीय आहे तसेच काहीही करायचं असेल तर लपूनछपून करु नका राजरोसपणे करा असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.
आज तर मंत्रिमंडळातलेही अनेक मंत्री सांगत होते की असा काही कार्यक्रम आहे हे आम्हाला माहितच नाही. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची पायाभरणी पुन्हा करायची असेलच तर लपून कशाला करता ? राजरोसपणे तो कार्यक्रम करा. आज जो काही कार्यक्रम ठरला, मग तो रद्द झाला हा विषय काही चांगला नाही यामुळे सरकारचं हसू होतं असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.
इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा भूमिपूजन कार्यक्रम पुन्हा आयोजित करणे, मंत्रिमंडळातील मंत्र्यांना सुद्धा तो माहिती नसणे, लगेच तो रद्द करणे, हे सारेच अनाकलनीय आहे.
आणि पुन्हा करायचंच असेल तर लपून-छपून का, राजरोसपणे करा ! pic.twitter.com/WHHleHaHXg— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 18, 2020
Read Also
पहाटेचा शपतविधी यशस्वी न होणे हीच… उदय सामंत यांच्याकडून फडणवीसांचा खरपूस समाचारhttps://t.co/spVigrPD3E#UdaySamant #DevendraFadanvis @samant_uday
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 19, 2020