वसई: राज्यात जागतिक महामारीने मोठ्या प्रमाणात थैमान घातले. त्यातच गेल्या दोन दिवसांत अत्यंत दुर्दैवी घटना महाराष्ट्रात घडल्या आहे. पहिली घटना नाशिकच्या झाकीर हुसेन हॉस्पिटल मध्ये घडली तर दुसरी घटना वसई विरार मधील हॉस्पिटल मध्ये घडली आहे. या दोन्ही घटनांमध्ये दुर्दैवाने ५० च्या आसपास रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. यावर आता राज्याचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरार येथील हॉस्पिटलमध्ये लागलेली आग आणि त्यात झालेले दुर्दैवी मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. एकीकडे या जागतिक महामारीचे प्रचंड भय लोकांच्या मनात आहे. त्यात हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या घटनांनी अधिक भर पडते आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत. पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. प्रत्येक घटनेनंतर मुख्यमंत्री आणि प्रशासन आम्ही याची चौकशी करू असं सांगतात. आणि दरवेळी सांगितलं जातं की हॉस्पिटलचं फायर ऑडिट करू, पण असं ऑडिट होताना कुठेच दिसत नाही. कोविड काळात हॉस्पिटल्सवर मोठा ताण आहे. अपुरा औषध साठा, ऑक्सिजनचा तुटवडा यांमुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक देखील संकटात आहेत. अशा परिस्थितीत काहीतरी व्यवस्था उभी केली पाहिजे. अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत, यासाठीचे चेक्स हॉस्पिटल्समध्ये कसे करता येतील हे पाहिलं पाहिजे.
भंडारा, नागपूर, मुंबई, नाशिक आणि आता विरार या घटना अतिशय गंभीर!
अशा घटनांमुळे कोविडविरोधातील लढाई आणखी कठीण होते.
आता तरी फायर सेफ्टी ऑडिटसाठी एक कालबद्ध कार्यक्रम आखून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याची खबरदारी घेतली पाहिजे!
नागपूर येथे माध्यमांशी संवाद..#MaharashtraFightsCorona pic.twitter.com/XNYeZFQIgq— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 23, 2021
या संदर्भात जर गरज असेल , तर सरकारने हॉस्पिटल्सला मदत केली पाहिजे. भंडारा, इशान्य मुंबई, नाशिक, विरार या सगळ्या घटना अतिशय भयानक आहेत . मृत्यूमुखी पडले त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. तिथल्या रुग्णांची परिवारासोबत आमच्या संवेदना आहे . तिथल्या रुग्णांची योग्य ती काळजी घेण्याची व्यवस्था सरकारने करावी आणि या घटनांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करावा. पुन्हा अशा घटना होणार नाहीत, याकरता काही प्रभावी पावलं सरकारच्या वतीने उचलली गेली पाहिजेत अशी माझी सरकारला विनंती आहे , असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.