मुंबई : आगामी काही महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याआधीच आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अशाच दिलीप वळसे पाटील यांच्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत. असं मोठं विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. त्यावर आता राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येणार ? त्या पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, दिलीप वळसे पाटील यांच्यामुळेच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना वळसे पाटलांनी इतकी संधी दुसऱ्या कुठल्याही विधानसभा अध्यक्षांनी दिली नसती. विधानसभेत विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे एक तास बोलायचे, त्यांच्याआधी आणि त्यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस एक तास बोलायचे.
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडचे ‘शरद पवार’ माजी आमदार विलास लांडे यांनी ‘ठोकला शड्डू’
विधानसभा अध्यक्ष त्यांना खूप वेळ द्यायचे. त्यामुळे माझ्यासह आमच्या पक्षातील इतर विधानसभा सदस्य वळसे पाटील यांच्याशी वाद घालायचे. त्यावर दिलीप वळसे पाटील म्हणायचे, मी निष्पक्ष आहे. मी कुठल्याही पक्षाचा नाही. आम्ही भांडल्यावर ते आम्हाला हेच उत्तर द्यायचे की स्पीकर हा निष्पक्ष असतो. मी देखील निष्पक्ष आहे. मी कुठल्याही पक्षाचा नाही. माझा तुमच्या पक्षाशी आता काहीच संबंध नाही. विधानसभेचा अध्यक्ष कसा असायला हवा याचा वस्तुपाठ दिलीप वळसे पाटलांनी घालून दिला होता. असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“आता मोठा भाऊ, छोटा भाऊ चालणार नाही”, पृथ्वीराज चव्हाणांनी खडसावलं
हेही वाचा..“देशातील जनता जागी झाली, मोदींचं पद कसंबसं वाचलं”, उद्धव ठाकरेंचा मोदींना खोचक टोला