मुंबई – पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव झाला आहे. या राज्यात भाजपला 100 चा आकडा पार करता आलेला नाही. मात्र, या निवडणुकीमध्ये डावे आणि काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. याच मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले.
पश्चिम बंगाल हा कम्युनिष्ट आणि काँग्रेसमुक्त झाला आहे. बंगालमध्ये आता भगव्याचा बोलबाला सुरु झाला आहे, असं फडणवीस यांनी म्हटलंय. पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपने मुसंडी मारत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला. त्यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील भाष्य केले.
“पश्चिम बंगाल हा कम्युनिष्ट आणि काँग्रेसमुक्त झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये आता भगव्याचा बोलबाला सुरु झालाय. तेथे आता उजव्या विचारांना भक्कम पाया लाभला आहे. मी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या. दुसऱ्याच्या घरी मुलगा झाल्यानंतर ते मिठाई वाटत आहेत. ढोल पिटत आहेत. येथे काँग्रेसची काय अवस्था झाली, हे पाहण्यासारखं आहे. ममता जिंकल्या म्हणजे काँग्रेस जिंकला असा अविर्भाव निर्माण झाला आहे. मागच्या वेळी आमचा फक्त 3 जागांवर विजय झाला आहे. यावेळी 80 पेक्षा जास्त जागांवर आम्ही निवडून आलो आहोत, असे फडणवीस म्हणाले.
तसेच पुढे बोलताना त्यांनी ममता बॅनर्जी आणि भाजप उमेदवार शुभेंदू अधिकारी यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लाढतीबद्दल भाष्य केले. “बंगालमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार ममता बॅनर्जी यांनासुद्धा निवडून येण्यासाठी दमछाक करावी लागली. त्यामुळे फक्त बंगालमध्ये पराभव झाला म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांची लोकप्रियता कमी झाली असे म्हणता येणार नाही. या पराभवाचे केंद्रीय नेते विश्लेषण करतील. आम्ही आसाममध्ये जिंकलो आहोत. पदुच्चेरीमध्ये जिंकलो आहोत,” असे फडणवीस म्हणाले.
Interaction with media in Mumbai on #AssemblyElectionResults https://t.co/mSYl6oWSyi
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 2, 2021