मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारला 1 वर्ष पुर्ण झाली आहेत. या काळात विरोधी पक्ष भाजपकडून सातत्याने हे सरकार पडेल, अशी वक्तव्य करण्यात आली. आता याबाबत राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केले असून, ‘महाविकास आघाडी सरकार पाडण्याची आमची योजना नाही, आम्ही सरकार पाडणारही नाही, तशी इच्छाही नाही. मात्र पडलच तर पर्यायी सरकार देण्याची आमची तयारी आहे’, असे म्हटले आहे.
भाजपच्या अनेक नेत्यांकडून पुढील काही महिन्यात हे सरकार पडेल, असा दावा करण्यात आला होता. आमच्याकडे सध्या 105 आमदार असले तरी त्याचे 150 आमदार कसे होतात, हे मी सांगण्याची गरज नाही. तेव्हा तशी परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे हे सरकार पडले, की 105 आमदारांचे 150 आमदार कसे होतील, हे तेव्हा दिसेल, असे फडणवीस काही दिवसांपुर्वी म्हणाले होते.
आता फडणवीसांनी पुन्हा एकदा असेच संकेत देत ‘सरकार पडेल तर पर्यायी सरकार देण्याची आमची तयारी’ असल्याचे म्हटले आहे.