मुंबई : राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या लेटर वॉरवरुन अमृता फडणवीसांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं होतं. “वाह प्रशासन ! महाराष्ट्रात दारुची दुकानं, शॉप्स सगळीकडे सुरु झाली. मग मंदिरं काय धोकादायक क्षेत्रामध्ये आहेत का ? अनेकदा असं होतं की बऱ्याच गोष्टी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते !” असे ट्विट अमृता फडणवीसांनी केले होते.या टीकेला शिवसेनेकडून जोरदार उत्तर देण्यात आलं होतं. यावर आता पुन्हा अमृता फडणवीसांनी शिवसेनेला डिवचत “बुल्डोजर सरकार माझं काय उखडणार ?” असा खोचक सवाल केला आहे.
शिवसेनेच्या पालिकेतील सभागृह नेत्या विशाखा राऊत प्रसारमाध्यमांवर प्रतिक्रिया देताना अमृता फडणवीसांना जोरदार उत्तर दिलं होतं. “अमृता फडणवीस कोण आहेत? आमदार, खासदार, नगरसेविका की प्रवक्त्या..त्या माजी मुख्यमंत्र्याच्या पत्नी आहेत. त्यांनी त्याच भूमिकेत राहावं. खासदार, आमदार, नगरसेवक, प्रवक्ता असेल तर ऐकून घेऊ. पती मुख्यमंत्री झाल्यावर राजकारणात आलेल्यांनी आम्हाला शिकवू नये. जर आम्ही तोंड उघडलं तर अमृता फडणवीसांना तोंड लपवायला जागा राहणार नाही, असा आक्रमक पवित्रा शिवसेनेनं घेतला होता.
त्यानंतर आता पुन्हा एकदा अमृता फडणवीस यांनी शिवसेनेला डिवचलं आहे “माझ्याकडे ना घर, ना दार; मग काय उखडणार बुल्डोजर सरकार,” असा प्रश्न अमृता फडणवीसांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटरवर ट्वीट करत त्यांनी हा प्रश्न विचारला आहे.
मेरे पास ना घर न द्वार,
फिर क्या उखाड़ेगी बुल्डोज़र सरकार ? https://t.co/RCLKwtM3tU— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) October 15, 2020
Read Also
सर्वधर्म समभावमध्ये हिंदू धर्म येत नाही का ?https://t.co/rzebMbamt8#ChandrkantPatil #Sanjayraut @rautsanjay61 @ChDadaPatil
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 15, 2020