मुंबई : मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने अभिनेत्री कंगना राणावत नेते, अभिनेत्यांकडून टीकेचा भडीमार होऊ लागला आहे. यातच कंगनाने 9 सप्टेंबरला मुंबईत येत आहे, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा, असे आव्हान दिल्याने हा वाद आता चिघळण्याची मोठा शक्यता निर्माण झाली आहे.सर्वच क्षेत्रातील व्यक्तींकडून कंगनाची वक्तव्यांचा निषेध होताना दिसून येत आहे.
शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या आता कंगना विरोधात चांगल्याच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. शिवसेना अभिनेत्री कंगना राणावत विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी कंगनाच्या फोटोला जोडे मारण्यात आले.
मुंबई बद्दलच्या ट्वीट विरोधात शिवसेनेच्या महिला आघडीने ठाण्यात कंगणाच्या पोस्टरला काळं फासलं. तिच्या पोस्टरला जोडा मारो आंदोलन केलं आहे. कंगनाला मुंबईत पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा देखीव यावेळी महिला शिवसैनिकांनी दिला. मुंबई पोलिसांवर अविश्वास आणि मुंबईची बदनामी केल्याप्रकरणी शिवसेना आता आक्रमक होत असल्याचे दिसून येत आहे.
ठाण्यात आनंद दिघे यांच्या शक्ती स्थळाजवळ हे आंदोलन करण्यात आलं. महिला शिवसैनिकांनी या वेळेस कंगनाच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली. कंगना रणौत हिनं केलेलं वक्तव्य हे निषेधार्य आहे. ती जर असंच बालिश वक्तव्य करत असेल तर तिच्या सर्व चित्रपटांवर आम्ही बहिष्कार टाकू. ती 9 सप्टेंबरला मुंबईत येत असेल तर तिचं शिवसेना स्टाईलमध्ये शिवसेना महिला स्वागत करतील, असा इशारा माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी दिला आहे.
त्यातच भाजपने देखील कंगनाच्या वक्तव्यांचा निषेद करत आपण त्या वक्तव्यांशी सहमत नसल्याचा खुलासा केला. भाजप आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतचा खुलासा केला.
Read Also
मुंबईचं बॉलिवूड इतर कुठे हलवण्याचा कट तर शिजत नाही ना ?: अनिल परबhttps://t.co/pCntB0wAzR@advanilparab @KanganaTeam @ShivsenaComms
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 4, 2020