मुंबई : राज्यात ठाकरे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, महाराष्ट्रामध्ये राष्ट्पती शासन लावण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे. उद्धव ठाकरे सरकारला हटवून राष्ट्रपती शासन लागू करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करण्यास नकार दिला असून आपण राष्ट्रपतींकडे जाऊ शकता अशा शब्दात याचिकाकर्त्याला उत्तर देण्यात आलं आहे. ही याचिका सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली आहे.
राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका वाढत असताना दुसरीकडे, मराठा आरक्षण, अस्मानी संकट डोक्यावर आहे अशात राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. त्यामुळे विरोधकांनी जोर धरत ठाकरे सरकार हटवण्याची मागणी केली होती. इतकंच नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, अशी शक्यता प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या कायद्याकडे कानाडोळा करत आहे. कृषी विधेयक स्वीकारणार नाही, असं राज्य सरकारने म्हटलं आहे. पण केंद्र सरकारने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रमध्ये संविधानानुसार राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकतो, असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला होता.
ठाकरे सरकार हटवून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी यासाठी विक्रम गेहलोत यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर तुम्हाला महाराष्ट्र किती मोठे राज्य आहे, हे माहित आहे का, असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्ते गेहलोत यांना खडेबोल सुनावले. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी सरकार संविधानाच्या आधारावर काम करत नाही असा आरोप याचिकर्ते गेहलोत यांनी केला होता. पण मुंबईत अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूची घटना घडली. त्यावरून संपूर्ण राज्यात राष्ट्रपती शासन लागू करणे योग्य नसल्याचे सरन्यायाधीश म्हणाले.
Read Also :
…अन्यथा लोकांचा 'ठाकरे’ नावावरील विश्वास उडेल,मनसेचा इशाराhttps://t.co/6DUyq4OvtJ#Rajthackarey #uddhavthackarey #MNS #ShivSena @RajThackeray @OfficeofUT @BalaNandgaonkar
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 16, 2020