मुंबई :- राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी विरोधात बंड पुकारला त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या सरकारमध्ये ते सामील झाले अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे यातच देवेंद्र फडवणीस यांनी दीड वर्षात राज्यातील दोन महत्त्वाचे पक्ष फोडल्याने देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्व वाढले आहे परंतु शिवसेना विरोधात बंड पुकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत युती केले आहे त्यावरून आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी यांच्या वर टीका केली आहे.
कालपर्यंत ज्यांना भ्रष्ट म्हणायचे, त्यांच्यावर सीबीआय/ईडी छापे मारायचे, आज त्यांना तुमच्या सरकारमध्ये सामावून घेतले आहे का? पंतप्रधानांना लाज वाटत नाही का? त्यामुळे जेव्हा पंतप्रधान म्हणतात, मी एकाही भ्रष्टाला सोडणार नाही, तेव्हा त्यांचा अर्थ असा – मी माझ्या पक्षात सर्वांना सामावून घेईन. असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी केलेलं वक्तव्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधी होतं. त्या वक्तव्यात त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष आहे. हे सांगताना त्यांनी राज्य सहकारी बँक आणि सिंचन विभागात जी तक्रार होती त्याचा उल्लेख केला. यामध्ये प्रधानमंत्र्यांनी जो आरोप केला, त्यानंतर आज राज्याच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी शपथ दिली. याचा अर्थ प्रधानमंत्र्यांनी केलेले आरोप वास्तव नव्हते. त्या आरोपातून पक्षाला आणि ज्यांच्याबद्दल आरोप केले त्यांना मुक्त करण्यात आले त्यासाठी मी प्रधानमंत्र्यांचा आभारी आहे. असा टोला शरद पवार यांनी मोदींना लगावला.