पुणे : ओबीसी आरक्षणाची फेरविचार याचिका न्यायालयाने रद्दबातल ठरवली. त्यामुळे ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. परंतू, खऱ्या अर्थाने ठाकरे सरकारला आरक्षण टिकवता आले. राज्य सरकारचा हा राजकीय डाव असून ते ओबीसी समाजावर अन्यांय करत आहे. केंद्राने यात हस्तक्षेप केल्याचे सांगत आरक्षणाचा चेंडू केंद्राकडे ढकलून जनतेला मुर्ख समजत नाहीत. परंतू आम्ही मुर्ख नेते नाहीत, आम्हाला माहित आहे, नेमके पाणी कुठे मुरत आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते म्हणाले, ठाकरे सरकारमधील एखाद्या नेत्याने ओबीसी आरक्षणाबाबतच्या प्रिपेरीकल डाटा काय असतो, हे समजून सांगावे. मी त्याला चांगला नेता म्हणेलं. खऱ्या अर्थाने प्रिपेरीकल डाटा समजून सांगणे गरजेचे असून ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्यासाठी मागारवर्गीय अहवाल सादर करणे गरजेचे आहे. परंतू हे या सरकारला सादर करता येते नसल्याने आरक्षणाचा चेंडू केंद्र सरकारवर ढकलत आहे, असे पाटील यांनी सांगितले.
आदित्य ठाकरेंना मुलगा बघा
आदित्य ठाकरेंचे लग्नाचे वय झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकार सतत केंद्राकडे बोट दाखवत आहे. ओबीसी आरक्षणाला केंद्र सरकारच जबाबदार असल्याचे वारंवार सांगत आहे. आदित्य ठाकरेंना दिल्लीत एखादी मुलगी असेल तर बघा अशी गत ठाकरे सरकारची झाली आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
पवारांची तबेत बघण्यासाठी फडणवीसांची भेट
शरद पवार यांची तबेत बरी नाही. त्यामुळे देवेद्र फडणवीस यांनी शदर पवारांची सिल्वर ओकवर भेट घेत आहे. परंतू, त्या भेटीला राजकीय गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे त्यांनी सांगितले.