मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी 25 हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 69 जणांना क्लीनचिट देण्यात आली आहे. या प्रकरणी अजित पवार यांच्यासह 69 जणांवर एफआयआर दाखल झाल्यानंतर जवळपास एक वर्षानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सत्र न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्य सहकारी बँकेचा घोटाळा कळतो का ? असा सवाल त्यांनी केला आहे. ते प्रदेश भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत बोलत होते. येत्या 12 तारखेला उद्धवा जागे व्हा आंदोलन देखील करणार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, 2011 ला रिझर्व्ह बॅंकेने हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा ठपका ठेवत राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त केले होते. सुरिंदर अरोरा यांनी या प्रकरणी 2010 साली हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती.